मुंबई: जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांची अस्वच्छता आणि वाईट सवयी. चीनमध्ये लोकांना वटवाघूळ खाण्याची सवय असल्यामुळे वटवाघुळांच्या शरीरातून कोरोना मानवी शरीरात आला असं सांगण्यात येतंय. त्यांच्या वाईट सवयीमुळे जगभरात कोरोना व्हायरस पसरला. मात्र आता भारतीयांची अशीच एक सवय आपल्याला महागात पडण्याची शक्यता आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करा. तसंच नेहमी स्वच्छतेचं पालन करा असं संगणयत येतंय. विशेष म्हणजे अशा काही गोष्टींचं पालन लोकांकडून केलंही जातंय. मात्र कितीही काळजी घेतली तरी जोपर्यंत भारतीय त्यांची कुठेही थुंकण्याची सवय सोडत नाहीत तोपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होणार नाही असा डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.
भारतात बहुतांश लोकांना रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय आहे आणि हीच सवय पुढे जाऊन कोरोनाच्या हाहाकारचं कारण बनू शकते. कोरोना बाधित व्यक्ती जर सार्वजनिक ठिकाणी थुंकत असेल तर त्याच्या थुंकीमुळे तब्बल २४ तासांपर्यंत इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी धक्कादायक माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.
जेव्हा कुठला कोरोनाबाधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकतो त्यावेळी त्याच्या तोंडातून थुंकीसोबत विषाणू बाहेर पडतात. जेव्हा कोणी व्यक्ती या थुंकीजवळून जातो तेव्हा त्याच्या शरीरात या थुंकीतले विषाणू प्रवेश करतात. यामुळे त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
जर तुम्हाला थुंकण्याची गरज वाटत असेल तर हे करा:
जर तुमच्या समोर कोणी थुंकलं तर हे करा:
सरकारनं याआधीही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये म्हणून नागरिकांना आवाहन केलं आहे. मात्र काही लोकं ऐकण्याच्या मानसिकतेत अजूनही नाहीत. मात्र जर ही सवय लोकांनी लवकर बंद केली नाही तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर यायला वेळ लागणार नाही.
corona affects more if Indians wil not giveup their habbit of spiting anywhere read full story
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.