ठाणे : दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना, दुसरीकडे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. शहापूर तालुक्यातील 201 आणि मुरबाड तालुक्यातील 34 अशा 235 गावपाड्यांना 41 टँकरद्वरे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात साधारणत: दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू लागतात. यंदा पावसाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दमदार हजेरी लावली होती. तसेच शहापूर आणि मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, असे असतांना देखील फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच शहापूर तालुक्यात पाणी टंचाई आहे.
शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असून सध्याच्या घडीला तालुक्यातील 46 गावे आणि 155 पाडे अशा एकूण 201 गावपाड्यांना 34 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर, मुरबाड तालुक्यातील 11 गावे आणि 23 पाडे असा 34 गावपाड्यांना टँकरद्वरे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कोरोनाबरोबरच टंचाईचा प्रश्न बिकट
ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यात या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना, पाणी टंचाईची समस्यादेखील मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
Crisis of water in Thane district, water supply by tanker read full story
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.