
मुंबईत कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना धान्य टाकू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर शहरातील कबुतरखाने बंद केले असून धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता याविरोधात जैन समाज आक्रमक झाला असून उपोषण आणि आंदोलन करणार असल्याचं जैन समाजाच्यावतीने जाहीर करण्यात आलंय.