डोंबिवलीतल्या दोन जिवलग मित्रांचा 'तो' ट्रेक ठरला अखेरचा

पाचवा दिवस उजाडला तरी त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
डोंबिवलीतल्या दोन जिवलग मित्रांचा 'तो' ट्रेक ठरला अखेरचा

डोंबिवली: ट्रेकिंगची (Treking) आवड असल्याने कोरोनाचे (corona) निर्बंध शिथिल होताच दोघांनी हिमाचल प्रदेश येथे ट्रेकिंगला जायचं ठरवलं. वयाची 60 ओलांडली असली तरी मनाचा उत्साह कुठेही आड येत नव्हता. गेले 40 वर्षे विविध ठिकाणी ट्रेक केल्याने त्याच अनुभवाच्या शिदोरीवर ते हिमाचल (Himachal) येथील ट्रेक पूर्ण करून परतणार तोच झालेल्या हिमवर्षावने त्यांचा घात केला. किन्नोर परिसरात झालेल्या दुर्घटनेत डोंबिवलीतील (dombivali) राजेंद्र पाठक व अशोक भालेराव या दोघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. आज पाचवा दिवस उजाडला तरी त्यांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील सुरेखा को. ऑप. सोसायटीत राजेंद्र पाठक (वय 67) तर ठाकुर्ली येथील स्नेहबंध सोसायटीत अशोक भालेराव (वय 66) हे रहावयास होते. दोघेही डोंबिवलीतील स.वा. जोशी शाळेचे विद्यार्थी, शाळेपासूनच राजेंद्र आणि अशोक यांची घट्ट मैत्री होती. राजेंद्र यांना ट्रेकिंग बरोबरच संगीताची देखील आवड होती. ते उत्कृष्ट गिटार आणि हार्मोनियम वादक होते. ट्रेकिंगची आवड दोघांना असल्याने जवळपास गेले 40 वर्षे त्यांनी सह्याद्री, एव्हरेस्ट, हिमाचल येथे ट्रेकिंग केले होते. हा अनुभव दांडगा असल्याने वयाची 60 ओलांडल्यानंतरही त्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासली होती.

डोंबिवलीतल्या दोन जिवलग मित्रांचा 'तो' ट्रेक ठरला अखेरचा
'डॅड मी आर्यनला तुरुंगात एकटं सोडणार नाही'

वर्षातून एकदा तरी ट्रेकिंगला जायचे हा जणू त्यांचा चंगच होता. कोरोना काळात बाहेर जाता आले नसले तरी, कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच मालाड येथील ग्रुप सोबत हिमाचल प्रदेश येथील ट्रेकला जाण्याचे त्यांनी ठरवले. 16 ऑक्टोबरला विमानाने ते हिमाचलला ते पोहोचले. तेथे त्यांनी इतर 17 जनांचा ग्रुप जॉईन करत ट्रेकिंगला सुरवात केली. 10 दिवसांचा ट्रेक संपवून ते 26 ऑक्टोबरला परत येणार होते. मात्र 23 ऑक्टोबरला किन्नोर भागात झालेल्या हिम वर्षावाने त्यांच्यावर घाला घातला.

डोंबिवलीतल्या दोन जिवलग मित्रांचा 'तो' ट्रेक ठरला अखेरचा
IND vs PAK: पाकिस्तानच्या वकारने अखेर हिंदुंची मागितली माफी

बर्फाखाली राज्यातील 3 जण गाडले गेले असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. यामध्ये पाठक आणि भालेराव यांचा समावेश आहे. आयुष्यभर सुख दुःखात एकमेकांची साथ दिली...उतारवयात ही त्यांना एकमेकांची लाभलेली साथ त्यांची आवड पूर्ण करण्यात आणि खऱ्या अर्थाने जीवन जगण्यात मदत करत होती. अशा मित्रांना मृत्यू देखील वेगळा करू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com