

मुंबई : वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर ई-चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही काही वाहनचालक त्याला जुमानत नसून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र दंडाच्या रकमेत दोन हेल्मेट येत आहेत. ५०० ते ८०० पर्यंतही हेल्मेट मिळते तर दंड १००० रुपये आहे. तरीही वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.