

मुंबई : मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणाचे प्रत्यार्पण होणे हे भारतासाठी मोठे यश आहे, असे मत २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातून बचावलेली देविका रोटावन यांनी मांडले. पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या अन्य कारस्थानी लोकांचाही भंडाफोड करत त्यांनाही जगासमोर आणले पाहिजे आणि पीडितांना न्याय दिला पाहिजे, असेही रोटावन यांनी म्हटले आहे.