
गायत्री ठाकूर
डोंबिवली : सध्या राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतीसोबतच फुलबागांवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी फुलांचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेत फुलांची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी गुलाब, झेंडू, मोगरा, जाई, तुळस यांसारख्या फुलांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा तब्बल दुपटीने वाढले आहेत. नागरी भागातील बाजारपेठेत विशेषतः सण-समारंभात फुलांची मागणी वाढत आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात फुले उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी दर वाढवले आहेत.