Mumbai Crime : दोन वर्ष तुरुंगात असलेल्या त्या विवाहितेला अखेर मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मित्राच्या हत्येप्रकरणी दोन वर्षे तुरुंगात असलेल्या विवाहितेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.
Mumbai High Court
Mumbai High Courtesakal

मुंबई - मित्राच्या हत्येप्रकरणी दोन वर्षे तुरुंगात असलेल्या विवाहितेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून खटल्याच्या निर्णयाला होणारा विलंब पहाता अर्जदाराला आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही असे निरीक्षण न्यायमूर्ती एन जे जमादार यांनी नोंदवले.

अर्जदार महिला पती व आपल्या दोन मुलींसह मुंबईच्या पोलीस क्वार्टर्स येथे राहत होते. पतीच्या त्रासाला कंटाळून ती २०१९ साली माहेरी सोलापूरला निघुन गेली. तेथे तिचा मित्र दादा जगदाळे तिला भेटला. त्यानंतर २०२१ साली ती पती सोबत पुन्हा नांदू लागली दादा जगदाळेचे महिलेला भेटण्यासाठी मुंबईत येणे जाणे सुरू झाले.

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने दादा जगदाळेला घरी बोलावून पत्नी समोरच त्याची कोयत्याने हत्या केली. या प्रकरणी पोलीसांनी ९ ऑक्टोबर २०२१ रोजी पती पत्नी दोघांना अटक केली. जामीन मिळावा म्हणून पत्नीने अ‍ॅड. ओंकार चितळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या समोर सुनावणी झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com