

Ghatkopar landslide 4 members of same family die
ESakal
मुंबई : उत्तर प्रदेशातील जोहनपूर गावात राहणारा आरिफ शेख आपल्या कुटुंबाचा आधार होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणखी चांगली नोकरी मिळावी, या आशेने त्याने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईपर्यंत नोकरीसाठी झालेला हा प्रवास त्याच्यासह संपूर्ण कुटुंबासाठी कायमचा थांबेल याची कल्पनाही कुणाला नव्हती.