

Heavy Rain Maharashtra
ESakal
शनिवारी (४ जुलै) मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हवामान विभाग दर तीन तासांनी सूचना पाठवत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक सतर्क आहे. त्यांनी लोकांना हवामान विभागाची सूचना तपासल्यानंतरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.