

Mumbai Rain Update
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून आता पुन्हा मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागांत अवघ्या दोन तासांत ३० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर वाढल्यामुळे, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असून नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.