
डोंबिवली : बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकतेच मुंबईतील पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेट वरील एकूण ४ झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे कामकाज हाती घेतले होते. यामुळे मुंबईतील एच पश्चिम विभागातील काही भागात १४ तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तर काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्यात आला. यामुळे ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यानंतर आता कल्याणमध्येही ८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.