

Dharavi fire victims rehabilitation
ESakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुंबईतील धारावी येथे राहणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. धारावीतील आगीत बाधित झालेल्या झोपडपट्टीवासीयांना फडणवीस सरकारने २७ वर्षांनंतर मोठा दिलासा दिला आहे. या सर्व धारावीवासीयांना आता त्यांचे हक्काचे घर दिले जाईल. आगीत घरे गमावलेल्या ४३६ झोपडपट्टीवासीयांना देवनारमध्ये जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.