Maharashtra Atrocity Act changes
ESakal
मुंबई
Atrocity Act: मोठी बातमी! अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?
Maharashtra Atrocity Act changes: अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत मोठा बदल करत महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की आता एफआयआर नोंदवल्यानंतर तात्काळ अटक होणार नाही.
महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ च्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत याची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की या कायद्यानुसार, एफआयआर नोंदवल्यानंतर लगेच अटक केली जाणार नाही. प्रथम एक समिती किंवा तपास अधिकारी प्रकरणाची चौकशी करेल आणि गुन्हा सिद्ध झाल्यासच अटक केली जाईल.

