

GateWay of India modern jetty
ESakal
मुंबई : मुंबई ज्याला 'स्वप्नांचे शहर' म्हणून ओळखले जाते. या शहराच्या प्रतिष्ठित खुणांपैकी एक असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे, पर्यटकांना यापुढे पूर्वीसारख्या प्रचंड गर्दीचा सामना करावा लागणार नाही. महाराष्ट्र सरकार या ऐतिहासिक सागरी परिसराचे पुनरुज्जीवन करण्याच्या तयारीला लागले आहे. विधानसभेत बोलताना, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घोषणा केली की, गेटवे ऑफ इंडिया येथील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, सरकार तेथे एक आधुनिक जेटी आणि प्रवाशांसाठी सुधारित सुविधा विकसित करण्याचा मानस बाळगून आहे.