

Mumbai Slum Rehabilitation Authority
ESakal
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला 2047 पर्यंत झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) 2030 पर्यंत मुंबईत सुमारे 7 लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. तसेच, पायाभूत सुविधांचे भव्य प्रकल्प आणि समूह विकास प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईत सुमारे 300 हेक्टरचे मोकळे भूखंड उपलब्ध होतील, असा विश्वास 'महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉनक्लेव्ह' या परिषदेत व्यक्त करण्यात आला.