

Cabinet Approves Secretariat Overhaul to Boost Efficiency and Decision-Making
sakal
मुंबई: प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन ३३ विभागांची संख्या वाढवून ४५ करण्यात येणार आहे. या विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ आणि ‘ईझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर भर देण्याबाबतचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच निश्चित केले आहे. मंत्रालयीन विभागांत सुसूत्रता आणण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात आली असून, यामुळे निर्णयप्रक्रियेचा वेग वाढणार आहे. तसेच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी समन्वय साधण्याचा वेगही वाढणार आहे.