माहुलवासियांसाठी न्याय मिळवण्याची ‘हीच ती वेळ’

न्याय मिळवण्याची ‘हीच ती वेळ’
न्याय मिळवण्याची ‘हीच ती वेळ’

मुंबई : ‘मुंबईतील नरक’ अशी ओळख बनलेल्या माहुल येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिले होते; मात्र सरकार स्थापन होऊन दीड महिना उलटला तरीही सरकारमधील कोणताही मंत्री माहुलकडे फिरकलेला नाही. त्यामुळे न्याय मिळवून घेण्याची ‘हीच ती वेळ’ असल्याचा निर्धार माहुलवासीय करत आहेत.

माहुल परिसरातील ७२ इमारतींमधील पाच हजारहून अधिक कुटुंबे मरणयातना भोगत आहेत. या मरणयातनेतून सुटका व्हावी यासाठी इथल्या रहिवाशांनी अनेक वेळा लढा दिला. त्यांनी सुरू केलेल्या ‘जीवन बचाव’ आंदोलनाला साडेचारशे दिवस पूर्ण झाले; मात्र त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे माहुलवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. मुंबईतील रिकामी ३०० घरे माहुलवासीयांना देण्याचे आश्‍वासन त्यांनी त्या वेळी दिले होते. आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री झाल्यावर माहुलवासीयांच्या प्रश्‍नाला हात घालतील, अशी सर्वांना अपेक्षा होती; मात्र सत्तेत आल्यापासून आदित्य ठाकरे माहुलमध्ये फिरकलेच नाहीत.

माहुलमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. आज या परिसरात १२ रासायनिक कारखाने, तीन तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत. यातून दररोज साडेसात कोटी लिटर कार्सिनोजेनिक रसायने बाहेर पडतात. तसेच या परिसरात २१ प्रकारची दूषित रसायने उत्सर्जित होतात. त्याचा परिणाम आसपासच्या ६० हजारहून अधिक राहिवाशांसह पर्यावरणावर होत आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत माहुल येथील १५० नागरिाकंचा मृत्यू झाला अाहे. सुमारे ८०० रहिवाशांना कर्करोग, दमा, त्वचारोग अाणि श्‍वसनाच्या विकारांनी ग्रासले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com