कोकणवासीयांची पायपीट सुरुच; गावाकडे परतणाऱ्यांचा जीवघेणा प्रवास

migrants
migrants

तळा (बातमीदार) : एरव्ही गाड्यांची वर्दळ असणाऱ्या मार्गावर आता मोजकीच वाहने तर जीवावर बेतून पायपीट करणारे मजूर जाताना दिसत आहेत. मुंबई येथून कोकणात पायी जात घर गाठण्यासाठी संघर्ष ते करत आहेत. परप्रांतियांना गावी पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे; मात्र कोकणवासीयांची पायपीट आजही सुरुच आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरुन अजुनही लोक शेकडो किलोमिटर पायपीट करीत असून एकही लोकप्रतिनीधी याकडे गंभीरपणे पाहात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  नागरिक आपापल्या परीने यथाशक्ती अन्नदान तसेच या तहानलेल्या, भुकेलेल्या, गावच्या ओढीने डोळ्यात आसवं, व्याकूळ झालेल्या, थकल्या भागल्या जीवांची तहान भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

संचारबंदीचे कठोर नियम पाळत हे पुण्यकर्म ही माणस करीत आहेत. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, प्रांत, तहसिलदार, पोलीस यंत्रणेप्रमाणेच या प्रसंगी मदत करणाऱ्या नागरिकांची भावना लक्षात घेऊन या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घ्यावे. उलट ही पायपीट थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनीधी यांनी  तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

अन्नदान, पाणी देणे हे कर्तव्य तर करुच पण या लोकांना त्यांच्या ईप्सीतस्थळी पोहचविणे ही देखील आपली जबाबदारी आहे. सध्या कोकणवासी रक्ताच पाणी करीत, कोरोनाचे भयंकर मानसिक वादळ झेलत, तणावग्रस्त अवस्थेत घरच्या माणसांच्या, गावच्या ओढीने, मनात जीवन जगण्याची शेवटची आशा घेऊन निघाले आहेत. कोकणवासीयांच्या यातना थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com