...अन् मुंबई ते गोरखपूर ते पायीच निघाले

labour
labour

चेंबूर (बातमीदार) : लाॅकडाऊन लागू होऊन महिन्याहून अधिक काळ उलटला. कारखाने बंद आहेत. हाताला काम नाही. सरकारने रेल्वे गाड्या सोडल्या; पण त्याचे भाडे कसे द्यायचे. अटींचे काही समजेना. तपासण्यामुळे तर आणखीच भिती निर्माण होत आहे. त्यामुळे आता आम्ही 100हून अधिक जण मस्जिद बंदरहून उत्तर प्रदेशला 1600 किलोमीटर पायीच जात आहोत, असे चेंबूर येथे एका पुलाखाली विश्रांतीसाठी काही वेळ थांबलेल्या मजुरांनी सांगितले.    

कोरोना विषाणुमुळे देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. रोजगाराच्या शोधात मुंबईत आलेल्या परप्रांतीय मजूरांनी काहि दिवस कसेबसे काढले; मात्र आता दिड महिन्यानंतर मुंबई कधी सुरू होईल, याची शाश्वती नसल्याने हवालदिल झालेल्या कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. मिळेल ते वाहन किंवा पायीच ते गावाकडे निघत आहेत. 

आज मशिद बंदर येथून शंभरच्या आसपास मजूर उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे पायीच निघाले होते. ते चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीजवळ काही वेळ विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता शहरात आता आरोग्याची भिती वाटत आहे, असे अनेकांनी सांगितले. आजारी पडल्यावर उपचार तरी मिळतील का? याची शाश्वती नाही. तुम्ही जिवंत तरी आहात का, अशी गावाकडून रोज विचारणा होते. त्यामुळे आम्ही आता सरळ आपल्या मार्गाने 1400 किलोमीटर चालत जाणार. कधी पोहोचू माहित नाही; मात्र आम्हाला सरकारने मध्येच अडवू तरी नये, असेही या कामगारांनी बोलून दाखवले. 

सरकारची प्रक्रिया किचकट
सरकारने मजुरांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सोडल्या असल्या तरी त्याचे अर्ज भरण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागते. दवाखान्याकडूनही सर्टिफिकेट लागते. ही किचकट प्रक्रिया समजत नाही आणि आता खर्चाचीही ऐपत नाही, असे मजुरांनी सांगितले. आता वैद्यकिय प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचे त्यांना सांगितल्यावर याबद्दल अजून माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com