

Traffic Snarl on Mumbai-Goa Route Causes Major Delays for Travelers
sakal
खेड/माणगाव: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अपूर्ण कामांमुळे रविवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लागला. रायगडमधील इंदापूर, माणगाव आणि कोलाड परिसरात तसेच रत्नागिरीतील संगमेश्वर, सावर्डे ते बावनदी टप्प्यात महामार्गाचे काम अर्धवट असल्याने तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.