Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Maharashtra Weather News: मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि पालघरमधील वसई-विरारसह राज्यातील अनेक भागांमध्ये अचानक आलेला पूर, नद्यांना आलेला पूर, झाडे उन्मळून पडणे यांसारखी विनाशकारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Maharashtra Weather News

Maharashtra Weather News

ESakal

Updated on

हवामान विभागाने आज (८ जुलै) पासून पुढील पाच दिवसांसाठी मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाटांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत काही मिनिटांच्या पावसानेच यंत्रणेची कसोटी घेतली. किंग सर्कल परिसरात, पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच रस्ते पाण्याखाली गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com