मेट्रो 12 प्रकल्पाला गती कल्याण तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण 15 दिवसांत पूर्ण होईल ;श्रीकांत शिंदे

महिन्याभरापासून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाचे सर्वेक्षणसुरू करण्यात आले आहे
Shrikant Shinde
Shrikant Shindesakal

डोंबिवली : कल्याण ग्रामीण भागास थेट मुंबई, नवी मुंबई, तळोजाला जोडण्यासाठी कल्याण - तळोजा मेट्रो 12 हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या कामास गती देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या कामास गती प्राप्त होत असून गेल्या महिन्याभरापासून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाचे सर्वेक्षणसुरू करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण चे हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या 15 दिवसांत ते पूर्ण होईल. त्यानंतर पुढील कामांना लवकरच सुरूवात होईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

मुंबईसह ठाणेपल्याडची कल्याण, डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधनेउपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे लवकरच या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण – डोंबिवली – तळोजा ( मेट्रो १२) यामार्गाकडे महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिले जाते.

या मेट्रो मार्गामुळे मुंबई, उपनगरातून ठाण्यात येणारा प्रवासी आणि ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी, कल्याण आणि थेट तळोजा तसेच नवी मुंबईला जोडला जाणार आहे. यासोबतच कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील, अंबरनाथ तालुक्यातील शहर आणि गावांतील प्रवासी थेट ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईला जाऊ शकणार आहेत. त्यामुळे मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण तसेच थेट नवी मुंबई असा सलग प्रवास विनासायास करता येणार आहे.

ठाणे पल्याडच्या नागरिकांना सध्या जलद वाहतूकीसाठी रेल्वे हा एकमेव पर्याय आहे. कोंडीतून रस्ते वाहतूक मुक्त होण्यासाठी कल्याण शीळ रोडचे रुंदीकरण व सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे. मेट्रोचा पर्याय या नागरिकांना मिळाल्यानंतर कल्याण डोंबिवली रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. तसेच रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना आणखी एक सुकर मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या मार्गाची जलदगतीने उभारणी महत्वाची आहे.

या प्रकल्पाला गती मिळावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रकल्पाला गती देण्याची चर्चा झाली. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या होत्या. या प्रकल्पासाठी सामान्य सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गेल्याच महिन्यात या मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली. आजपर्यंत या सर्वेक्षणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. या प्रकल्पाला गती मिळाल्याने कल्याण तळोजा ही महत्वाकांक्षीमेट्रो लवकरच प्रत्यक्षात उतरणार असल्याची आशा खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

मेट्रो 12 अशी आहे...

कल्याण तळोजा ही मेट्रो मार्गिका ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो मार्गिकेला जोडली जाणार आहे. त्यामुळेठाणे ते तळोजा हे कल्याणमार्गे अंतर सहजरित्या कापता येणार आहे. हा मार्ग एकूण 20.75 किमी लांबीचा असून यात 17 मेट्रो स्थानके असणार आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासूनहा मार्ग सुरू होणार आहे. तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीणभागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक आहे. या मार्गामुळे शहरी भागासहग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com