

मुंबई : म्हाडाकडून मुंबईसह महामुंबईत सर्वसामान्यांसाठी हजारो परवडणारी घरे उभारली जात असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे; मात्र म्हाडाच्या कोकण मंडळाचे कार्यक्षेत्र असलेल्या महामुंबईतील परवडणाऱ्या घरासाठीच्या मोठ्या जागाच संपल्या आहेत. त्यामुळे कोकण मंडळाने ठाणे, पनवेल, पालघरमधील तब्बल ३५० हेक्टर सरकारी जमिनी मिळाव्यात, अशी मागणी पाच महिन्यांपूर्वी सरकारकडे केली होती. त्यावर अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने म्हाडाला भूखंडाची प्रतीक्षा आहे. तसेच भूखंड नसल्याने नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यावर मर्यादा येत आहेत.