...अन् त्यांचा प्रवास अखेरचा ठरला
...अन् त्यांचा प्रवास अखेरचा ठरला

...अन् त्यांचा प्रवास अखेरचा ठरला

वडखळ : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चालत गावची वाट धरली. भर उन्हात महामार्गावरुन निघालेल्या या चाकरमान्यांसह त्यांच्या लहान लहान मुलांनीही आई-बाबांचे बोट धरले. मुंबईतील कांदिवली येथून आपल्या कुटुंबासह श्रीवर्धनकडे चालत निघालेल्या मोतीराम जाधव (वय 43) यांचा मात्र हा प्रवास अखेरचा ठरला. पेणमधील खारपाडा येथे गुरुवारी (ता. 14) जाधव यांच्या थकलेल्या देहाने साथ सोडली. 

मूळचे श्रीवर्धन आदगाव येथील सात जणांचे जाधव कुटुंब मुंबईतील कांदिवली येथून चालत निघाले. तीव्र उन्हाच्या झळा, थकलेला जीव; मात्र तरीही गावी जाण्याची तीव्र ओढ असल्याने हे कुटुंब पावले टाकत होते. गुरुवारी 80-82 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते पेण तालुक्यातील खारपाड्यापर्यंत आले. एवढे अंतर चालून थकलेल्या मोतीराम जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते रस्त्यात कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com