

Politics on Mumbai Bihar Bhavan
ESakal
मुंबई : दिल्लीनंतर आता आर्थिक राजधानी मुंबईतही ‘बिहार भवन’ उभारले जाणार आहे. बिहार सरकारने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून राज्याची प्रगती आणि सार्वजनिक कल्याणासाठी प्रशासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच या प्रकल्पाला राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत तब्बल ३१४.२० कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली आहे.