मुंबई : कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज आतापर्यंत सर्वाधिक 600 हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 7688 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत.
केंद्र शासनाने सुमारे एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारित धोरण जाहिर केले होते. त्यानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना 14 दिवसांऐवजी दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या देखील वाढली आहे. रविवार दिनांक 10 मे रोजी 399 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर 11 मे रोजी 587, 12 मे रोजी 339, 13 मे रोजी 422, 14 मे रोजी 512, 15 मे रोजी 505, 16 मे रोजी 524 आणि आज 17 मे रोजी 600 हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये 3700 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 7688 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यातील 50 टक्के रूग्ण हे 10 ते 17 मे या कालावधीतील आहेत.
साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.
Most hotspots in hotspots like Mumbai, Pune, Malegaon, read detail story
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.