

Fraud Case
ESakal
मुंबई : मुंबईतील कथित बहुकोटी गुंतवणूक फसवणूक प्रकरणाने राज्यभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची तब्बल ₹१०० कोटींपेक्षा जास्त रकमेची कथित फसवणूक झाल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी अंकित दीपक जैन, ओंकार सिंह आणि हेतुल रांका यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणेला पुढील चौकशीसाठी मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.