Mumbai-Ahmedabad: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १५ तास भीषण कोंडी! प्रवाशांचे अन्न-पाण्याविना हाल; २० किमीपर्यंत वाहनरांगा

Mumbai-Ahmedabad Highway Traffic: दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १५ तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
Mumbai-Ahmedabad Highway Traffic

Mumbai-Ahmedabad Highway Traffic

ESakal

Updated on

पालघर : पालघर जिल्ह्यासह दक्षिण गुजरातमध्ये सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (ता. २४) मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील १५ तासांच्या रखडपट्टीने हजारो प्रवाशांचे अक्षरशः हाल केले. दोन्ही दिशेने २० किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमध्ये महिला, लहान 1 मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती अन्न-पाण्याविना अडकून पडल्या होत्या. शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने त्यांना प्रचंड कुचंबणेला सामोरे जावे लागल्याने आपत्कालीन यंत्रणा आणि नियोजनाचा अभाव उघड झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com