

Pen Ganesh idol workshops flooded
sakal
मुंबई, रायगड : जवळपास संपूर्ण जून महिना वाट पाहायला लावल्यानंतर मुंबईसह कोकणपट्टीत गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम होता. पावसामुळे मुंबईत अनेक भाग जलमय झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. वाकण आणि नागोठणेदरम्याच्या हॉटेल गुलमोहरजवळ कोलाडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.