

Mumbai BEST Bus Traffic change
ESakal
मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' बस सेवेला मोठा फटका बसला आहे. शहरातील विविध भागांत झाडे उन्मळून पडल्यामुळे आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे बेस्ट प्रशासनाने अनेक प्रमुख मार्गांतील बसेस इतर मार्गांवर वळवल्या (डायव्हर्ट) आहेत. तर काही ठिकाणी एकेरी मार्गिकेतून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. ५ जुलै २०२६ रोजी दुपारपर्यंतच्या बेस्ट वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत.