Mumbai : भाऊ, आई-वडीलांच्या मृत्यूनंतर कंम्प्युटर प्रोग्रॅमरने ३ वर्षे कोंडून घेतलं; ऑनलाइन फूड ऑर्डर करायचा, घरात कचऱ्याचा ढिग

Anup Kumar Nair : आई-वडील आणि भावाच्या निधनामुळे नैराश्यात गेलेल्या अनुपमने घरातच कोंडून घेतलं होतं. ऑनलाइन फूड ऑर्डर केल्यानंतर ती द्यायला येणाऱ्या डिलिव्हरी बॉईजशीच त्याचा संपर्क असायचा.
Mumbai: Coder Lives Alone for 3 Years After Family Deaths
Mumbai: Coder Lives Alone for 3 Years After Family DeathsEsakal
Updated on

नवी मुंबईतील जुईनगर इथं एका ५५ वर्षीय कम्प्युटर प्रोग्रॅमरनं तब्बल ३ वर्षे घरात कोंडून घेतल्याचं समोर आलंय. एकटेपणा आणि नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीचं नाव अनुप कुमार नायर असं आहे. आई-वडील आणि भावाच्या निधनामुळे नैराश्यात गेलेल्या अनुपमने घरातच कोंडून घेतलं होतं. ऑनलाइन फूड ऑर्डर केल्यानंतर ती द्यायला येणाऱ्या डिलिव्हरी बॉईजशीच त्याचा संपर्क असायचा. त्याव्यतिरिक्त कोणाशीच त्याचा संबंध येत नसे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com