Why Construction Site Ban In Mumbai
esakal
Mumbai Air Pollution : राजधानी दिल्लीत प्रदूषणाची मोठी समस्या आहे. अनेकांना मास्क लाऊन घराबाहेर पडावं लागतं आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्ली प्रमाणेच आता मुंबईतील हवेची गुणवत्ता देखील खालावते आहे. मुंबईतील काही भागात प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे एक्यूआयदेखील वाढला आहे. त्यापार्श्वभू्मीवर मुंबई पालिकेने जीआरएपी-4 च्या पातळीवरील निर्बंध लागू केले आहेत.