

Mumbai Concretization
ESakal
मुंबई : वाढत्या काँक्रीटीकरणामुळे मुंबईत तापमान वाढत असून शहराची जमिनीत पाणी जिरण्याची क्षमता शून्यावर आली आहे. 'मोंगाबे'च्या अहवालानुसार, जुने डांबरी रस्ते सुमारे ३० टक्के आणि पेव्हर ब्लॉक्स ५० टक्के पाणी जमिनीखाली जिरू देत असत; मात्र मुंबई महापालिकेकडून सध्या सुरू असलेल्या वेगवान काँक्रीटीकरणामुळे पाणी जिरवण्याचे प्रमाण शून्यावर पोहोचले आहे.