

BEST Bus Route Diversion
ESakal
मुंबई : मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने 'बेस्ट' प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक बस मार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने तात्काळ डायव्हर्शन लागू केले आहे.