

Barvi Dam water level
ESakal
मुंबई : मागील चार दिवसांपासून मुंबईसह उपनगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय क्षेत्रातही चांगला पाऊस पडला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ होत चालली आहे. बारवी धरणात शनिवारी ५३.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून भातसा, तानसा, मोडक सागर, अपर वैतरणा, मध्य वैतरण आणि आंध्रा धरणातील पाणीसाठ्यातही उत्तम वाढ झाली आहे.