
Mumbai Rain
ESakal
मुंबई : रविवार रात्रीपासून मुंबईसह राज्यभरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या संततधार कोसळत आहेत. यामुळे सखल भागात पाणी साचले असून वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. अशातच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.