मुंबई : लॉकडाऊन असले तरी लग्नाळूंना दिलासा देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेऊन लग्न करता येणार आहे; मात्र वऱ्हाडींची संख्या मर्यादित ठेवावी लागणार आहे. तसेच मत्स्य उद्योगासंबंधी सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मासळी बाजारही सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील 452 ठिकाणे वगळता इतर ठिकाणी सोमवारपासून (ता. 20) कामकाज सुरू करण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. हे व्यवहार सुरू करताना कामकाजाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे. तसे न केल्यास संबंधितांना एक वर्षाची कैद होऊ शकते. याव्यतिरिक्त पानटपऱ्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यांना परवानगी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.