पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्वाचे असल्याने झाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.
मुंबई - पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्वाचे असल्याने झाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी होळीचा सण असून होळीसाठी कोणीही अनधिकृतपणे झाडांची कत्तल केल्यास दंड अथवा कैद अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा केल्या जातील. त्यामुळे होळी सणानिमित्त अनधिकृत वृक्ष तोड करु नये, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. होळीच्या सणा निमित्त अवैध वृक्षतोड केली जाते. अशी वृक्षतोड पर्यावरणाला हाणीकारक ठरते. त्यामुळे होळीच्या सणानिमित्त कोणीही अवैधपणे झाडांची कत्तल करु नये. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास व तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम २१ अन्वये अपराध आहे.
अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी रुपये एक हजार ते ५ हजारपर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, असा इशारा उद्यान विभागाने दिला आहे. त्यामुळे ‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका विभाग कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांस व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.