Mumbai News : कृत्रिम पाऊसासाठी पालिकेने मागवली निविदा

प्रदूषण दूर करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने त्यासाठी ई निविदा मागवल्या आहेत.
mumbai municipal corporation
mumbai municipal corporationsakal

मुंबई - प्रदूषण दूर करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने त्यासाठी ई निविदा मागवल्या आहेत. १४ डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल.

सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्या १४ डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. निवड झालेली कंपनी कृत्रिम पावसासाठी आवश्यक वातावरण, वेळ, ठिकाण यांची निश्चिती करेल आणि मगच या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून रस्ते धुतले जात आहेत. यावर प्रचंड खर्च होत आहे. मात्र कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास रस्ते धुण्याचा खर्च वाचवता येणार आहे.कृत्रिम पाऊस पाडण्याचा अनुभव असलेल्या कंपनीचीच या कामासाठी निवड केली जाईल. कृत्रिम पाऊस पाडण्याचा किमान सात वर्षांचा अनुभव असावा हे निकष कंपनीच्या निवडीसाठी महत्त्वाचे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com