अमित शहांच्या टीकेनंतर अरविंद सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल; शिवसेना-भाजप 50-50 च्या सूत्रावर केलं महत्त्वाचं भाष्य

अमित शहांच्या टीकेनंतर अरविंद सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल; शिवसेना-भाजप 50-50 च्या सूत्रावर केलं महत्त्वाचं भाष्य

मुंबई, ता. 8 : शिवसेनेला कोणतेही वचन दिले नाही हे सांगायला दिड वर्ष लागली ,यातच कोठेतरी पाणी मुरतयं. शिवसेना भाजपमध्ये 50-50 चे सुत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच जाहीर केले होते. असे प्रतिउत्तर शिवसेनेकडून देण्यात आले आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कोणतेही आश्वासन दिले नव्हते.असे जाहीर केले.त्यावर शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिउत्तर दिले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच 50-50 चे सुत्र ठरले होते. निवडणुकीनंतर हे सुत्र पाळले गेले नाही. ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही. म्हणूनच त्यांना पुढील पाऊल उचलावे लागले, असेही  सावंत म्हणाले.

जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शहा हरियाणाला गेले. अशा वेळी त्यांनी मुंबईला यायला हवे होते. असे असताना मग ते मुंबईत येऊन त्यावर का बोलले नाहीत असा सवालही सावंत यांनी केला.

त्यांच्या वेदना समजू शकतो

शिवसेनेला सत्तेच्या जोरावर जेव्हा जेव्हा संपवण्याच्या वल्गना झाल्या, तेव्हा शिवसेना अधिक बळकट झाली. शिवसेना कधी संपणार नाही. त्यांच्या वेदना आम्ही समजू शकतो, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही लगावला.

mumbai news arvind sawant retaliates to the comment made by amit shah at sindhudurga

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com