

Dadar Tilak Bridge Heavy vehicles banned
ESakal
मुंबई : देशात आता वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या म्हणून उदयास येत आहे. ही समस्या भारतात अनेक ठिकाणी आढळते. महाराष्ट्रही यापेक्षा वेगळा नाही. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे मुंबईतून वाहतुकीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आणि आपत्कालीन वाहनांचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी दादरमधील टिळक पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे.