Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी (ता.12) नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. १६ मार्चला यात्रा मुंबईत दाखल होणार आहे.
राहुल गांधी चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील तर १७ मार्चला शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
आज मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली.या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राखी जाधव, शिवसेना (उबाठा)खासदार अरविंद सावंत, सुभाष देसाई, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, आम आदमी पक्षाचे धनराज वंजारी यांचा समावेश होता.
मणिपूरमधून निघालेल्या भारत जोडो यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा ६७ दिवसांत ६७०० किमीचा प्रवास करत आहे. राहुलजी गांधी यांनी मागली वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर ४००० किमी ची पदयात्रा काढली होती.भारत जोडो न्याय यात्रेसाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील राहुल गांधी यांच्या यात्रेचे भव्य स्वागत केले जाणार आहे. समाजातील महत्वाच्या घटकांना न्याय देण्यावर या यात्रेत भर देण्यात आला. युवा न्याय, सहभागी न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, व कामगारांना न्याय देण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे.
उद्धव ठाकरेना निमंत्रण
शिवाजी पार्कवरील सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले तसेच इंडिया आघाडीतील मित्र पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सर्वांच्या उपस्थितीत ही सभा होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.