Mumbai: मुंबई पोलीस आयुक्तांचे महत्त्वपूर्ण पाऊल! आता मुंबईकरांचा आवाज थेट आयुक्तलयात पोहोचणार, जनता दरबार भरणार, पण कधीपासून?

Deven Bharti Janata Darbar: मुंबई पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता मुंबईकरांचा आवाज थेट आयुक्तलयात पोहोचणार आहे. मुंबईत जनता दरबार भरवण्यात आले आहे.
Deven Bharti Janata Darbar
Deven Bharti Janata DarbarESakal
Updated on

मुंबईकरांचा आवाज थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या जनता दरबारात दर मंगळवारी, मुंबईकर कोणत्याही पूर्वपरवानगी किंवा अपॉइंटमेंटशिवाय थेट पोलीस आयुक्तांना भेटू शकतील. त्यांच्या समस्या मांडू शकतील आणि त्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा करू शकतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com