Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Mumbai Water Cut : या काळात मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन 10% कपात केली जाणार आहे.ए, बी, ई, एफ दक्षिण व एफ उत्तर विभागासह पूर्व उपनगरांतील अनेक विभाग प्रभावित होतील.मुलुंड, भांडूप, नाहूर, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्येही पाणी कपातीचा फटका बसणार.
Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?
Updated on

Summary

  1. मुंबईत ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सलग तीन दिवस पाणी कपात होणार.

  2. पिसे व पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील 100 किलोव्‍हॅट विद्युत केंद्रातील मीटर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.

  3. दररोज दुपारी १२:३० ते ३:०० या वेळेत अडीच तास काम केले जाईल.

मुंबई शहरात तीन दिवस पाणी कपातीचे संकट उद्भवणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्‍हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ७ ते ९ ऑक्टोबर पर्यंत शहरात पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com