

BMC River Revitalization Work
ESakal
मुंबई : मुंबईला पावसाळ्यात तुंबण्यापासून वाचवण्यासाठी आणि शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. मात्र, इतका अवाढव्य खर्च करूनही मिठी नदीचा प्रश्न सुटलेला नाही, की इतर नद्यांचे पुनरुज्जीवन पूर्ण झाले नाही.