Mumbai News: पुराच्या संकटावर कायमचा तोडगा! महापालिकेने आखली नवी योजना; जाणून घ्या सविस्तर

Municipal Scheme: पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या सोडण्यासाठी महापालिकेने नवी योजना आखली आहे. यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या जमिनीत जाणे शक्य होणार आहे.
BMC

BMC  

ESakal

Updated on

मुंबई : पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुंबई महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. हवामान बदलामुळे वाढलेल्या अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या जमिनीत झिरपवणाऱ्या ‘बायोस्वेल’ सुविधांचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महापालिकेने १२,७०५ कोटी रुपयांचा प्रस्ताव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एनडीएमए) पाठवला असून, त्याचाच महत्त्वपूर्ण भाग म्हणून शहरभर ८०० बायोस्वेल्स उभारण्याची योजना आखली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com