

BDD Chawl
ESakal
मुंबई : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर, आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली होती. भोगवटा प्रमाणपत्र आल्याने म्हाडानेही संबंधित रहिवाशांना घराचा ताबा देण्याची तयारी सुरू केली होती; मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने चावीवाटपाचा मुहूर्त ठरत नव्हता.