'मुंबईची तुंबई अशी ओळख यंदाही जागतिक पातळीवर करणार का?'

'राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यासाठी काही धोरण आखणार आहे का?'
Nitesh Rane
Nitesh Raneesakal
Summary

'राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यासाठी काही धोरण आखणार आहे का?'

सध्या अनेक राजकीय मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टपासून ते शिवसेना सभा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तर सभेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, अगामी पालिका निवडणुकाच्या अनुषंगानेही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष वाढला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा भाजपाने मुंबईच्या विषयावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरंल आहे.

Nitesh Rane
'पवारांविषयीची केतकी चितळेची फेसबुक पोस्ट घाणेरडी अन् चुकीची'

दरवर्षी आमच्या मुंबईची तुंबई होते आणि तशीच ओळख सत्ताधारी शिवसेनेने करून ठेवली असल्याची खरमरीत टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील अनेकांचे हकनाक जीव जातात. मात्र काही ठेकेदारांच्या मर्जीसाठी रंगरंगोटीच्या कामापलिकडे मुंबई महापालिका काहीच करत नाही, असा गंभीर आरोपही आमदार राणे यांनी केला आहे.

ते म्हणाले, यंदा पाऊस चांगला पडणार अशी माहिती मिळत आहे. मुंबईचे जे 386 फ्लड पॉईंट आहेत तिथे केवळ पाण्याचे पंप बसवून चालणार आहे का? याने हा प्रश्न सुटणार आहे का? राज्य सरकार आणि पालिका यासाठी काही धोरण आखणार आहे का?, असा सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. की फक्त मुंबईची तुंबई होते ही ओळख याही वर्षी जागतिक पातळीवर करणार आहात का?, असंही ते म्हणाले आहेत.

Nitesh Rane
आसाममध्ये पावसाळ्यापूर्वी पूर; सुमारे 57 हजार नागरिकांना फटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com