Mumbai Curfew : मुंबईत जमावबंदी नाही.. अफवांवर विश्वास ठेऊ नका..

काही दिवसापासून मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी लागू केल्याची बातमी प्रसार माध्यमात पाहायला मिळत होती.
Mumbai Police
Mumbai Policeesakal
Summary

काही दिवसापासून मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी लागू केल्याची बातमी प्रसार माध्यमात पाहायला मिळत होती.

मुंबई - काही दिवसापासून मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी लागू केल्याची बातमी प्रसार माध्यमात पाहायला मिळत होती. प्रसार माध्यमातील बातम्यांमुळे मुंबईत जमावबंदी लागू होणार असे वातावरण तयार झाले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शनिवारी एक निवेदन जारी केले. या निवेदनात शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू झाल्याच्या अफवा खोट्या असल्याचे निवेदनात स्पष्ट आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

बेकायदेशीर मेळावे आणि रॅली टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी 3 ते 17 डिसेंबर दरम्यान शहरात निर्बंध लागू केले आहेत, असे पोलिसांनी आदेशात सांगितले आहे. ऑर्डर ही एक नियमित प्रक्रिया असून त्या प्रक्रियेचे दर 15 दिवसांनी पुनरावलोकन केले जाते. या मुद्द्यावर पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशात नांगरे पाटील यांनी सांगितले की, मुंबईत कोणत्याही ठिकाणी कर्फ्यू नाही. मुंबईकरांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com